गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या व आपल्या बापजाद्यानी गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारी शिल्पे. हे गडकोट आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. ह्या गडकोटांसाठी महाराजांनी व मावळ्यांनी वेळप्रसंगी रक्त सांडवून हे गडकोट राखले आहेत. महाराज हे गडकोट अगदी प्राणांच्या पलीकडे जपत होते. “सह्याद्री प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या ह्याच विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सुरु आहे. यासाठी संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या गडकोटांच्या संवर्धन कार्याचा वारसा पुढे घेऊन मार्गक्रमण करणारी संस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची अतुलनीय गाथा सांगणाऱ्या गडकोटांचे संवर्धन कार्य अविरत सुरु आहे. हे कार्य यापुढेही असेच अविरत सुरु असेल. आपला अतुलनीय अनमोल ऐतिहासिक वारसा असाच आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवता यावा यासाठी असलेला हा अट्टाहास. अन हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपलाही हातभार असावा म्हणूण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक दुर्गसेवक या कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.
छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून आजही जिवंत आहेत, पण आज एकाच गोष्टीचे वाईट वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येक मरगळलेल्या माणसाला नेहमीच प्रेरणा देत आहे आणि यापुढेही राहील. त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघर पोहचविण्याचे काम करत आहे. यामध्ये आपणही सहभागी व्हा.